Home Blog Page 125

भाजपा सरकारला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी कॉग्रेसचे पाचोऱ्यात धरणे आंदोलन

0

Loading

पाचोरा  :- निवडणुकीच्या काळात भाजपाने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हमीभावाने खरीप आणि रब्बी पिकांची खरेदी, जीएसटीमधून शेतीमालाच्या आवश्यक वस्तूंना सूट, आणि वीज दरांमध्ये सवलत यांसारखी अनेक आश्वासने दिली होती. मात्र, सत्ता मिळाल्यानंतर या आश्वासनांची अंमलबजावणी झालेली नाही. परिणामी, शेतकरी अडचणीत सापडले असून त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने पाचोरा येथे एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित केले.
     या आंदोलनात शेतकऱ्यांना तातडीने संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, तसेच सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा यांसारख्या महत्त्वाच्या पिकांची शासनाने हमीभावाने खरेदी करावी, या मागण्यांचा पुनरुच्चार करण्यात आला. याशिवाय, जे शेतकरी त्यांच्या पिके खुले बाजारात कमी दराने विकण्यास मजबूर झाले, त्यांच्यासाठी ‘भावांतर योजना’ त्वरित लागू करावी, अशीही जोरदार मागणी करण्यात आली.
      सध्या राज्यभरात वीज वितरण कंपनीकडून घरगुती आणि शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या वीज कनेक्शनवर स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम राबवली जात आहे. मात्र, स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना अनावश्यक आर्थिक भार सोसावा लागत आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांनी याला मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला असून, काँग्रेस पक्षाने या स्मार्ट मीटर बसवण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. त्यामुळे, हा निर्णय मागे घेऊन ग्राहकांवर अन्याय होऊ नये, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची प्रमुख मागणी होती.
          शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या खते, बियाणे, कीटकनाशके आणि शेतीसाठी लागणारी अवजारे यांना जीएसटीमधून मुक्त करण्याची गरज आहे. परंतु, सरकारच्या अनास्थेमुळे या वस्तूंच्या किमती वाढल्या असून, शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. सरकारने जीएसटीमधून या वस्तूंना मुक्त केल्यास, शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी होईल आणि शेती अधिक फायदेशीर ठरेल, असा मुद्दा या आंदोलनात उपस्थित करण्यात आला.
     या आंदोलनादरम्यान, भाजप सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरकारला त्यांच्या निवडणूकपूर्व आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा”, “खोटी आश्वासने देणारे सरकार हाय हाय”, “संपूर्ण कर्जमाफी अमलात आणा” यांसारख्या घोषणा दिल्या. या आंदोलनानंतर, काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार विनोद कुमावत यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
    या धरणे आंदोलनात काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीपराव पवार, तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माइल शेख फकिरा, जिल्हा सरचिटणीस प्रताप पाटील, जिल्हा सचिव राजेंद्र महाजन, इरफान मनियार, युवक प्रदेश सरचिटणीस आशुतोष पवार, मनोहर महाले, महिला सरचिटणीस कुसुम पाटील, शरीफ शेख, शंकर सोनवणे, उबाठाचे अरुण पाटील, अॅड. के. एस. पाटील, आनंद अहीरे, नवल भोई, युवक काँग्रेस अध्यक्ष कल्पेश येवले, सुनील पाटील, मुबारक शेख, प्रकाश भिवसने, साहेबराव पाटील, दशरथ पाटील, रामसिंग जाधव, रविंद्र राठोड, चेतन बोदवडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     यावेळी उपस्थित नेत्यांनी भाजप सरकारला कडक शब्दांत इशारा दिला की, जर सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर काँग्रेस पक्ष राज्यभर तीव्र आंदोलन करेल. शेतकऱ्यांचे हक्क आणि कल्याण ही काँग्रेस पक्षाची प्राथमिकता असून, शेतकऱ्यांच्या लढाईत काँग्रेस त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असे नेत्यांनी स्पष्ट केले.
      शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत भाजप सरकारकडून चालू असलेल्या दुर्लक्षाविरोधात काँग्रेसने केलेले हे धरणे आंदोलन मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवलेली एकजूट आणि संघर्षभावना पाहता, भविष्यात यासंदर्भात आणखी तीव्र आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या मातोश्री स्व.गं.भा.नर्मदाआई धनसिंग पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित सर्वपक्षीय शोकसभा व सार्वजनिक कीर्तनाचा कार्यक्रम

0

Loading

पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या मातोश्री स्व.गं.भा.नर्मदाआई धनसिंग पाटील यांचे सोमवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सर्वपक्षीय शोकसभा आणि सार्वजनिक कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या शोकसभेसाठी आणि कीर्तनासाठी परिसरातील मान्यवरांसह सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
स्व. गं.भा. नर्मदाआई यांच्या स्मरणार्थ सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन शुक्रवार, ७ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजता करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शिवतीर्थ-चिंतामणी कॉलनी, भडगाव रोड, पाचोरा येथे संपन्न होणार आहे या शोकसभेसाठी पाचोरा तसेच परिसरातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी वर्ग, ग्रामस्थ आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत. स्व.गं.भा.नर्मदाआई पाटील यांनी आयुष्यभर आपल्या कुटुंबासोबतच समाजासाठीही योगदान दिले. त्यांच्या सहृदय आणि दयाळू स्वभावामुळे त्या संपूर्ण परिसरात विशेष मान्यता प्राप्त व्यक्ती होत्या.आमदार किशोरआप्पा पाटील यांनी मातोश्रीप्रती आपले भावनिक वक्तव्य करतांना सांगीतले
“आई ही आपली पहिली गुरू असते. तिच्या संस्कारांतूनच आम्ही समाजसेवा आणि लोकहिताची भावना बाळगतो. माझ्या मातोश्रींनी आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी तसेच इतरांसाठीही समर्पित भावनेने कार्य केले. त्या आम्हाला सोडून गेल्या असल्या तरी त्यांच्या शिकवणीने आणि विचारांनी आम्हाला आयुष्यभर मार्गदर्शन मिळत राहील.”
सर्वपक्षीय शोकसभेनंतर स्व. गं.भा.नर्मदाबाई धनसिंग पाटील यांच्या आत्मशांतीसाठी एक सार्वजनिक कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कीर्तन सोहळा दोन दिवस चालणार असून, यात दोन प्रसिद्ध कीर्तनकार आपली विचारधारा आणि आध्यात्मिक संदेश देणार आहेत.पहिले कीर्तन:
शुक्रवार, ७ मार्च २०२५ रोजी रात्री ८:०० वाजता
कीर्तनकार: ह. भ. प. समाधान महाराज भोजेकर
दुसरे कीर्तन: शनिवार, ८ मार्च २०२५ रोजी सकाळी ८:०० वाजता कीर्तनकार: ह. भ. प. गोविंद महाराज वरसडेकर
या कीर्तनांच्या माध्यमातून जीवनाचे तात्त्विक स्वरूप, श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकात्मतेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला जाणार आहे.
तर उत्तरकार्याचा कार्यक्रम – अंतिम श्रद्धांजली
शोकसभेच्या दुसऱ्या दिवशी, शनिवार, ८ मार्च २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता उत्तरकार्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हे विधीवत धार्मिक कार्यक्रम असणार असून, परिवारातील सदस्य, आप्तेष्ट आणि नागरिक यात सहभागी होतील.
या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. शिवसेना-युवासेना, महिला आघाडी, पाचोरा-भडगाव यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पाचोरा आणि परिसरातील नागरिकांनी त्यांच्या अंत्ययात्रेच्या प्रसंगी स्व.गं.भा.नर्मदाआई धनसिंग पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांच्या आठवणी सांगितल्या. एका नागरिकाने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “त्या खूप प्रेमळ आणि संयमी स्वभावाच्या होत्या. समाजातील अनेक गरजूंना मदतीचा हात देण्याचे त्यांचे कार्य प्रेरणादायी होते.”
हा शोकसभा आणि कीर्तन सोहळा केवळ श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम नाही, तर त्यांच्या स्मृतींना कायमचे जतन करण्याचा एक प्रयत्न आहे. परिवार, समाज, नातेवाईक आणि हितचिंतकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. पाचोरा आणि परिसरातील सर्व नागरिकांना या शोकसभेसाठी उपस्थित राहणार आहेत

पाचोरा पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या विरोधात ॲड. चव्हाण यांचा तक्रारीचा अर्ज दाखल

0

Loading

जळगाव – जिल्हा सत्र न्यायालयातील वकिली व्यवसाय करणारे ॲड सचिन सुरेश चव्हाण यांनी पाचोरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक अशोक पवार यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०८  (7)अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
त्यांच्या तक्रारीत म्हणण्यानुसार, काही महिन्यांपूर्वी त्यांच्या  पक्षकाराने एका महिलेविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्या प्रकरणी चौकशीसाठी पाचोरा पोलीस ठाण्यात उपस्थित राहावे, असे

त्यांना सांगण्यात आले. चौकशी दरम्यान, पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी तक्रारदार व त्यांच्या पक्षकार मित्रांसोबत उर्मट आणि बेकायदेशीर वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय, पोलिसांनी अपमानास्पद वर्तन करत धमकी दिल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. “तुम्हाला कायद्याचे ज्ञान आहे का?”, “तुम्ही वकिलीचे शिक्षण घेतले असले तरी कायद्याचे शिक्षण घेतले आहे का?” अशा प्रकारच्या अपमानास्पद शब्दांत त्यांचा अपमान करण्यात आला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारदाराने या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, त्यांनी पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.
यासंदर्भात माहिती प्रत्यक्ष मुख्यमंत्री आणि गृह मंत्रालयासह, महाराष्ट्र पोलीस तक्रार निवारण प्राधिकरण आणि पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांना पाठवण्यात आली आहे. यावर प्रशासन काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.

गांधी नगरातील श्री अंबाजी माता मंदिर वर्धापनदिन सोहळा: नगरपालिकेने रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करावी

0

Loading

पाचोरा: श्री अंबाजी माता मंदिराच्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्त ४ मार्च २०२५ रोजी मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी नगर येथील या मंदिरात महाप्रसाद (भंडारा), महापूजा, पार्थिव शिवलिंग पूजन व महाआरतीचे आयोजन असून, या सोहळ्यासाठी हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. मात्र, या सोहळ्याच्या

पार्श्वभूमीवर गांधी नगर परिसरातील भुयारी गटारीमुळे मुख्य रस्त्यांवरील खड्डे हे भाविकांसाठी मोठी समस्या ठरत आहेत. मंदीराकडे येणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता संभाव्य अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. स्थानिक नागरिक व भाविकांनी प्रशासनाकडे तातडीने या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. श्री अंबाजी माता मंदिराचा वर्धापन दिन हा भाविकांसाठी श्रद्धेचा मोठा सोहळा असतो. त्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये, तसेच कार्यक्रम निर्विघ्न पार पडावा, यासाठी पाचोरा नगरपालिकेने तसेच विद्यमान नगरसेवक व भावी नगरसेवक यांनी ही महत्वाची समस्या लक्षात घेऊन तातडीने लक्ष घालून संबंधित रस्त्यांचे डांबरीकरण अथवा खड्डे बुजवण्याचे काम हाती घ्यावे, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.  नगरपालिकेने वेळीच उपाययोजना केल्यास, या धार्मिक सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही आणि कार्यक्रम निर्विघ्न पार पडेल. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पत्रकाराच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरण – पत्रकार संदीप महाजन यांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांची तातडीने कारवाई

0

Loading

पाचोरा: शहरात मोठी खळबळ उडवणाऱ्या
पत्रकाराच्या अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात पत्रकार संदीप महाजन यांनी आक्रमक भूमिका घेताच पोलिस प्रशासनाची तपास यंत्रणा सक्रिय झाली. तब्बल पाच दिवसा पासून बेपत्ता असलेली मुलगी केवळ १२ तासांच्या आत पोलीसांनी हरवलेली मुलगी आणि मुलगा शोधून ताब्यात घेतल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी फारशी तत्परता दाखवली नव्हती. मात्र, पत्रकार संदीप महाजन यांनी व काही पत्रकार बांधवांनी या

प्रकरणाचा जोरदार पाठपुरावा करत पोलिस प्रशासना विरोधात आक्रमक भूमिकेमुळे तपास यंत्रणा वेगाने कार्यान्वित झाली मुलाच्या वडीलांना व नातेवाईक, मित्र यांना पोलीसी भाषा दाखवताच अल्पावधीतच पोलीसांनी आरोपींचा माग काढून मुलगी आणि मुलगा दोघांना ताब्यात घेतले.
     या घटनेनंतर नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अन्य प्रकरणांमध्ये तक्रारींची दखल घेण्यासाठी दिवसेंदिवस विलंब होतो, तपास ढिसाळपणे रेटला जातो, मात्र पत्रकारांनी

आवाज उठवताच १२ तासांतच गुन्ह्याचा उलगडा होतो, हे आश्चर्यकारक असल्याचे मत व्यक्त केले.
     पत्रकार महाजन यांनी या संपूर्ण प्रकरणात पोलिस प्रशासनावर कडक शब्दांत टीका केली असून, “सर्वसामान्य नागरिकांनीही आपल्यावरील अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेतली पाहिजे. जर पोलिसांना योग्य पद्धतीने काम करण्यास भाग पाडले, तर तपासाची गती वाढते,” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. आता सदर प्रकरणी पुढे काय होते आणि आरोपीस मदत केल्या प्रकरणी कोणाला आरोपी केले जाते व कोणाला अभय दिले जाते याकडे लक्ष लागुन आहे
    ही घटना पाचोरा शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या ढासळत्या परिस्थितीचे प्रतिबिंब असुन पोलिसांनी केवळ दबावाखाली येऊन नव्हे, तर प्रत्येक प्रकरणात तत्परतेने काम करावे, अशी मागणी आता समाजातून होऊ लागली आहे.

श्री अंबाजी माता मंदिराचा २६ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा होणार

0

Loading

पाचोरा – शहरातील श्री अंबाजी माता मंदिर यंदा आपल्या २६ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. ४ मार्च २०२५, मंगळवार रोजी हा सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे.
    मंदिर विश्वस्त आणि भाविक मंडळींनी हा सोहळा अत्यंत भव्य स्वरूपात आयोजित केला असून, महापूजा, पारंपरिक सोहळे, महाआरती आणि महाप्रसाद (भंडारा) या निमित्ताने भाविकांसाठी उपलब्ध असणार आहेत.
महापूजा: सकाळी ७.०० ते ९.०० पारंपरिक सोहळा: सकाळी ९.०० ते १०.३० महाआरती: सकाळी १०.३० ते ११.००
महाप्रसाद (भंडारा): सकाळी ११.०० ते दुपारी २.०० हा सोहळा श्री अंबाजी माता मंदिर, गांधी नगर, पाचोरा येथे आयोजित करण्यात आला असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये या वर्धापनदिन सोहळ्याबद्दल उत्साहाचे वातावरण असून, मंदिराचा परिसर विद्युत रोषणाईने सजवला जाणार आहे. मोठ्या प्रमाणावर भक्तगण उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने, आयोजकांनी आवश्यक व्यवस्थापन केले आहे.

टायगर किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक सांस्कृतिक उत्सवात रंगली चिमुकल्यांची नटखट अदाकारी! पालकांचा उत्स्फूर्त सहभाग

0

Loading

पाचोरा – येथील बाजोरिया नगर भागातील टायगर किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक सांस्कृतिक उत्सवाला पालक आणि उपस्थित मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रोहन पाटील आणि प्रियंका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव रोडवरील वाघ डेअरी समोरील प्रांगणात या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पाचोरा नगर पालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार, भारत पाटील, रविंद्र पाटील, सपना शिंदे, अमोल बडगुजर, तुषार आणि भुषण सर, भरत खंडेलवाल, प्रा. सी. एन. चौधरी, ध्येय न्यूजचे संचालक संदीप महाजन, राहूल पाटील, अनिल येवले, ललिता पाटील, वैशाली पाटील, ऐश्वर्या वाघ, प्रा. गौरव चौधरी, अक्षय शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या भव्य वार्षिक सोहळ्यात पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांची उधळण करत नृत्य, गायन, नाट्य, वकृत्व, फॅन्सी ड्रेस अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. विशेष म्हणजे, कार्यक्रमातील सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी विविध भारतीय भाषांमध्ये केले आणि त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा सुंदर प्रयत्न केला.
चिमुकल्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमांतून विविध सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मोबाईलचा अतिरेकी वापर, प्लास्टिक आणि गुटखा बंदी, स्वच्छता अभियान, ओला व सुक्या कचऱ्याचे विलगीकरण, व्यसनांचे दुष्परिणाम, पालकांची भूमिका, कौटुंबिक सुसंवाद आणि संस्कारांचे महत्त्व या विषयांवर विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटके आणि एकपात्री अभिनयाद्वारे प्रभावी प्रबोधन केले. त्यांच्या उत्कट सादरीकरणामुळे उपस्थित पालक आणि मान्यवर भारावून गेले.
या सांस्कृतिक सोहळ्यात मुलांनी सादर केलेल्या विविध कलाकृतींना पालकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. मुलांच्या सहज आणि निरागस अभिनयाने, जोशपूर्ण नृत्याने आणि प्रभावी संवादांनी संपूर्ण वातावरण भारून गेले. अनेक पालकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “या कार्यक्रमामुळे मुलांच्या आत्मविश्वासात वाढ होत असून, त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळतो.”
सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना मिळावी आणि त्यांना समाजातील विविध समस्यांविषयी जागरूक करता यावे, हा या वार्षिक उत्सवामागील मुख्य हेतू होता. विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून पालक व प्रेक्षकांना अंतर्मुख करायला लावणारे संदेश दिले.
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्यांची भरभरून प्रशंसा केली. पाचोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम महत्त्वाचे असतात. शिक्षणाबरोबरच कलागुणांना चालना देणे हे विद्यार्थी घडविण्यासाठी गरजेचे आहे.”
पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी मुलांच्या सामाजिक भान जपणाऱ्या सादरीकरणाबद्दल कौतुक व्यक्त केले आणि सांगितले की, “या लहानग्यांनी मोठ्यांनाही शिकण्यासारखे काहीतरी दिले आहे. सामाजिक जबाबदारीची जाणीव ही लहान वयातच निर्माण झाली पाहिजे.”
तसेच, प्रा. सी. एन. चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयोगशीलतेबद्दल गौरवोद्गार काढले. ध्येय न्यूजचे संचालक संदीप महाजन यांनीही आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांच्या अभिनय व वक्तृत्व कौशल्यांची प्रशंसा केली.
या उत्सवात विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे विविध रंग सादर केले. भारतीय परंपरा, सण, उत्सव, तसेच देशप्रेम यासंदर्भातील विविध नृत्य-नाट्यांचे सादरीकरण करण्यात आले. विशेषतः “संस्कारांचे महत्त्व” या नाटिकेने उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. या नाटिकेमध्ये पालकांनी आपल्या मुलांशी कसा संवाद साधावा, त्यांना नैतिकता आणि मूल्यांची शिकवण कशी द्यावी या संदर्भात अत्यंत मार्मिक संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला पालकांनी भरभरून दाद दिली. टायगर किड्स इंटरनॅशनल स्कूलचे संचालक रोहन पाटील आणि प्रियंका पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलेला चालना देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पालकांनी त्यांचे आभार मानले.
रोहन पाटील यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले की, “विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्यांच्यातील सृजनशीलता विकसित होते.”
कार्यक्रमाच्या अखेरीस प्रियंका पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि असेच कार्यक्रम भविष्यातही आयोजित करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाची सांगता आनंदमय वातावरणात झाली. विद्यार्थ्यांनी उत्तम सादरीकरण केलेल्या कार्यक्रमांची उजळणी पालकांनी घरीही केली. अनेक पालकांनी सांगितले की, “अशा कार्यक्रमांमुळे मुलांना आपले सुप्त गुण सादर करण्याची संधी मिळते आणि त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलते.”
शाळेने यापुढेही अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पालकांनी केली. संपूर्ण सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आणि पालकांसाठी आनंददायी आठवण बनला.

जागतिक महिला दिन विशेष: ‘गुजर सखी’ आयोजित बहुरंगी उत्सव – महिलांसाठी खास स्पर्धा, मनोरंजन आणि आरोग्य तपासणी!

0

Loading

पाचोरा – महिलांचा जागतिक दिन हा केवळ साजरा करण्याचा दिवस नसून, त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याची संधीही आहे. याच उद्देशाने ‘गुजर सखी’ महिला मंडळाच्या वतीने शनिवार, दि. ८ मार्च रोजी सु. भा. प्राथमिक विद्या मंदिर, देशमुखवाडी, पाचोरा येथे भव्य आणि बहुरंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ ते ६ या वेळेत होणाऱ्या या अनोख्या कार्यक्रमात महिलांसाठी विविध स्पर्धा, मनोरंजन, पारंपरिक वेशभूषा प्रदर्शन, आणि आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षणांमध्ये…
१) एकल लोकनृत्य स्पर्धा – मराठमोळ्या ठसक्यात!
लोकसंस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे पारंपरिक एकल लोकनृत्य (सोलो फोक डान्स) हे विशेष आकर्षण ठरणार आहे. महिलांना ३ मिनिटांच्या वेळमर्यादेत नृत्य सादर करता येईल. महाराष्ट्राच्या समृद्ध नृत्यपरंपरेला चालना देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
२) मराठी वेशभूषा स्पर्धा – संस्कृतीचा गौरव!
महिलांनी पारंपरिक मराठी पेहराव करून या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी आहे. नऊवारी साडी, पैठणी,किंवा आपल्या बालपणातील मराठी पेहराव,महाराष्ट्रातील नामांकित मराठी महिला व्यक्तिमत्वाचे पेहराव..इत्यादींना प्राधान्य देण्यात आले आहे..
३) विनोदी उखाणा स्पर्धा – शब्दसौंदर्याची जादू!
महाराष्ट्रीयन लग्नसमारंभात रंगत आणणाऱ्या उखाण्यांची ही स्पर्धा महिलांसाठी खास ठेवण्यात आली आहे. मात्र पारंपरिक उखाणा न घेता विनोदी शैलीतील, चतुरस्र आणि सृजनशील उखाणे सादर करून सहभागी महिला आपली कलात्मकता सिद्ध करू शकतात.
४) ‘होम मिनिस्टर’ –ज्या महिला वरील तीन स्पर्धेत सहभागी होवू शकत नसतील त्या सर्वांसाठी घरगुती खेळांचा जल्लोष!
महिलांसाठी विविध घरगुती खेळ आयोजित करण्यात आले आहेत. विनोदी आणि कौशल्यावर आधारित विविध खेळ खेळून महिलांना आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देता येईल.
या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी तिच्या आवडीचे खास वान तिला भेटवस्तू स्वरूपात देण्यात येणार आहे. त्यासोबतच कोल्ड कॉफी आणि स्वादिष्ट अल्पोपहार यांचा आस्वाद घेण्याची संधीही महिलांना मिळणार आहे.
महिला आरोग्यासाठी विशेष उपक्रम: रक्त तपासणी शिबिर!
महिला दिनाच्या निमित्ताने ८ ते १० मार्च या कालावधीत महिलांसाठी विविध आरोग्य तपासणी मोफत केली जाणार आहे. या तपासणीमध्ये रक्तगट, हिमोग्लोबिन पातळी, थायरॉईड, आणि रक्तातील साखर (शुगर लेव्हल) यांचे परीक्षण केले जाणार आहे. या तपासणीचा लाभ घेण्यासाठी महिलांनी आपली नावनोंदणी लवकरात लवकर करावी.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये:
✅ संपूर्णतः मोफत सहभाग – कोणत्याही स्पर्धेसाठी शुल्क आकारले जाणार नाही.
✅ वेळेवर सुरू होणारा कार्यक्रम – ठरलेल्या वेळेतच सर्व कार्यक्रम पार पडतील.
✅ सर्व महिलांना सहभागी होण्याचे आवाहन – मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा.
स्पर्धेसाठी संपर्क आणि नावनोंदणी:
स्वाती पाटील – 970440303
महिला दिनानिमित्त आयोजित हा विशेष कार्यक्रम महिलांना एकत्र आणण्यासोबतच त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्याचे साधन ठरणार आहे. पारंपरिकतेची गोडी, स्पर्धेचा रोमांच, मनोरंजनाचा आनंद आणि आरोग्यविषयक जागरूकता एकत्र अनुभवण्यासाठी हा सोहळा नक्कीच अविस्मरणीय ठरेल!
असे आवाहन डॉ सौ सोनाली पाटील,सौ वैशाली पाटील,सौ शीतल महाजन यांनी केले आहे

पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या अकार्यक्षमते विरुद्ध तीव्र आंदोलनाचा इशारा!

0

Loading

पाचोरा – शहरातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून, नागरिक असुरक्षिततेच्या भावनेत जीवन जगत आहेत. शहराच्या इतिहासात प्रथमच गावठी कट्टे सापडण्यासारखे गंभीर गुन्हेगारी प्रकार घडत आहेत. पोलिस प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे गुन्हेगारांना खुलेआम अभय मिळत आहे. तसेच, कोट्यवधी रुपयांच्या हेराफेरी प्रकरणी कोणतीही चौकशी वा कारवाई होत नसल्यामुळे प्रशासनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत, पाचोरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक अशोक पवार यांच्या तात्काळ बदलीसाठी आणि त्यांच्या कार्यक्षमतेची चौकशी करण्यासाठी तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे, असा इशारा पत्रकार संदीप महाजन यांनी दिला आहे.
विशेष म्हणजे बहुजन समाजातील व्यक्ती व पत्रकार धनराज पाटील यांच्या अल्पवयीन मुलीला चक्री या अवैध धंद्यातील तरुणाने पळवुन नेले तरी सदरचा तपास संशयास्पद आहे
१) शहरात गावठी कट्टे सापडण्याच्या घटनांनी नागरिक भयभीत
२) गुन्हेगारांशी पोलिसांचे मैत्रीपूर्ण संबंध – गुन्हेगारीला मिळतेय अभय ठराविक पोलिसांचे मोबा. नंबरचे कॉल डिटेल तपासले तर गुन्हेगार , अवैध धंदेवाले यांच्याशी किती सलोख्याचे संबंध आहेत हे सहज लक्षात येईल
३) नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही किंवा विलंब केला जातो
४) तक्रारींच्या नोंदीत पक्षपात – ठराविक लोकांना संरक्षण
५)सामान्य नागरिकांना त्रास, तर गुन्हेगारांना आश्रय
६)आर्थिक व्यवहारातून ठराविक लोकांचेच प्रश्न सोडवले जातात
७) महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष – बेपत्ता मुलीच्या शोधासाठी कुटुंबियांकडून पैसे आणि वाहनसह इतर खर्च वसूल करणे
८) निर्भया पथकाचे अपयश – महिलांना संरक्षणाचा अभाव
९) अवैध दारू, जुगार अड्डे, सट्टे , चक्री व इतर गुन्हेगारी प्रकारांवर पोलीस मूकदर्शक संमती
१०) पोलीस दलातील अंतर्गत शिस्तभंग – कायद्याची खिल्ली उडवली जाते ठरविक पोलीस व अधिकाऱ्यांवर आशिर्वाद विरोध करणारे व कलेक्शन न आणणाऱ्या पोलीसांवर कारवाई करणे किंवा त्यांचे विरोधात वरिष्ठांन कडे रिपोर्ट पाठवणे
११) पाचोऱ्यात कोट्यवधी रुपयांची हेराफेरी झाल्याचे विद्यमान आमदार किशोरआप्पा यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत स्पष्ट केले होते.
या प्रकरणी अद्याप कोणतीही चौकशी

नाही, तपास नाही, कारवाई नाही!विशेष म्हणजे या प्रकरणात जितेंद्र आहिरे नामक दलीत समाजाचा एक प्राध्यापक बेपत्ता आहे तरी त्याच्या तपासावर प्रगती शुन्य या प्रकरणी माळी नामक व्यक्तीला ताब्यात घेतले नंतर आर्थीक तडजोड झाली की काय? त्यावर चुप्पी
पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या कार्यकाळात मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांना वाचा फुटली असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.
गंभीर गुन्ह्यांच्या तपासात ढिलाई
आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ
तपास प्रक्रिया लांबवून अन्यायकारक वर्तन
यामुळे कायद्याच्या अंमलबजावणीवर नागरिकांचा विश्वास उडाला आहे
यासाठी पोलिस निरीक्षक अशोक पवार यांची तात्काळ बदली करावी.
स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी.
शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.
कोट्यवधी रुपयांच्या हेराफेरी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
जर प्रशासनाने तातडीने योग्य कारवाई केली नाही, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पत्रकार संदीप महाजन यांनी दिला आहे. विविध राजकीय पक्षाचे मान्यवर, विविध सामाजिक संघटना व जागृत नागरिकांनी आपले अंतर्गत मतभेद, गटतट बाजुला ठेऊन या आंदोलनात सहभाग घेऊन आपल्या हक्कांसाठी लढा द्यावा, असे आवाहन महाजन यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

पाचोरा अल्पवयीन मुलीचे अपहरण – पोलिस प्रशासनाची कुंभकर्णी झोप! पालकांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धावण्याचे संकेत

0

Loading

पाचोरा- शहरात एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची धक्कादायक घटना घडली असून, संबंधित मुलगा आणि त्यास मदत करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याऐवजी पोलिस प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या प्रकरणात नवीन कायद्यांतर्गत कठोर गुन्हे दाखल होणे आवश्यक असतानाही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे मुलीच्या पालकांची सहनशक्ती संपली असून, त्यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (DCPU) आणि महिला व बाल विकास विभागासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची तयारी दाखवली आहे.या घटनेने संपूर्ण शहरात चिंता आणि रोष व्यक्त होत असून, पोलीस प्रशासनाचा कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अपहरण झालेल्या मुलीच्या पालकांनी पोलिसांना वेळोवेळी माहिती दिली, तक्रारी दाखल केल्या, परंतु

पोलिसांचा दिरंगाईचा आणि निष्क्रियतेचा पवित्रा अजूनही कायम आहे. वास्तविक, CCTV फुटेज, मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड्स पळून जाण्यास मदत करणारे यांचा तपास युद्धपातळीवर होणे गरजेचे होते, मात्र तसे काहीही घडत नसल्याचे दिसत आहे अल्पवयीन मुलीच्या अपहरणासंदर्भात बालकांचे लैंगिक अपराध संरक्षण कायदा (POCSO Act) तसेच भारतीय दंड संहिता (IPC) च्या विविध कलमांखाली आरोपी व त्यास मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणे आवश्यक होते. विशेषतः, अपहरण, बालविवाहासाठी जबरदस्ती, लैंगिक शोषण, संगनमत करून गुन्हा करण्यास मदत करणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांवर कठोर कारवाई अपेक्षित होती. तथापि, पोलिसांनी संबंधित मुलाला मदत करणाऱ्यांना व नातेवाईकांना अद्याप ताब्यात घेतलेले नाही आणि त्याच्या मित्रमंडळींविरोधात कोणतीही ठोस कारवाई केली गेलेली नाही.
अल्पवयीन मुलीचे अपहरण हे केवळ एका कुटुंबाचे दु:ख नाही, तर संपूर्ण समाजासाठी धोक्याची घंटा आहे. जर पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई केली असती, तर इतर कोणत्याही आरोपींना असे कृत्य करण्याची हिंमत झाली नसती. पण दुर्दैवाने, पाचोरा पोलीस प्रशासन “अधिकृत आदेश” आणि “पुराव्यांच्या चाचण्या” याच्या नावाखाली वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणात मुलाचे कुटुंबीय, मित्रमंडळी आणि इतर सहकारी यांना तातडीने चौकशीसाठी ताब्यात घेणे आवश्यक होते. परंतु, पोलिसांकडून याबाबत कोणतीही ठोस हालचाल झालेली नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास विलंब केला, कॉल रेकॉर्ड्स मिळवण्यात निष्काळजीपणा दाखवला आणि मोबाईल लोकेशनद्वारे मुलीचा ठावठिकाणा लावण्यास विलंब केला, हे विशेष चिंतेचे कारण ठरत आहे.
परिस्थिती अशी आहे की, पाचोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुलेआम गावठी कट्टे आणि इतर गुन्हेगारी कृत्ये उघडकीस येतात, मात्र स्थानिक पोलिसांना याची माहितीही राहत नाही. काही दिवसापूर्वी, जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गावठी कट्ट्यांची मोठी तस्करी उघड केली होती, पण आश्चर्य म्हणजे, पाचोरा पोलीस प्रशासन मात्र याबाबत अनभिज्ञ राहिले होते. चोऱ्याचे प्रमाणतर नित्याचे झाले आहे त्यामुळे या पोलीस प्रशासनाची जबाबदारी, तत्परता आणि कारवाई करण्याची इच्छाशक्ती यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अल्पवयीन मुलीच्या अपहरणासारख्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी जर तातडीने अॅक्शन घेतली नाही, तर अशा घटनांमध्ये गुन्हेगारांना अभय मिळत राहील आणि समाजात असे प्रकार पुन्हा घडण्याची भीती वाढेल
पोलिसांची चालढकल पाहून मुलीच्या पालकांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (DCPU) आणि महिला व बाल विकास विभागाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. पालकांचा आक्रोश इतका प्रखर आहे की, या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शासन न झाल्यास आणि पोलिसांनी निष्क्रियता दाखवल्यास, आम्ही न्यायालयीन लढाई लढण्यास तयार आहोत, असेही त्यांनी जाहीर केले आहे.महिला व बालविकास विभागाने POCSO कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्याची शिफारस केली असून, जिल्हा प्रशासनानेही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली पाहिज
मुलाच्या कुटुंबीयांवर आणि मित्रमंडळींवर पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई का केली नाही?
पोलिसांची ही झोप अपहरण करणाऱ्या आरोपीला अभय देण्याचा प्रकार आहे का?
जर पोलिसांनी आता तातडीने कारवाई केली नाही, तर हे प्रकरण जिल्हा स्तरावरच नाही, तर राज्य पातळीवर मोठ्या आंदोलनाचा विषय ठरू शकतो.
  हा केवळ एक गुन्हा नाही, तर समाजात वाढत असलेल्या अशा घटनांचे प्रतिबिंब आहे. जर अल्पवयीन मुलींना अशा प्रकारे फसवले जात असेल आणि पोलिसांकडून योग्य कारवाई होत नसेल, तर भविष्यात कायदा-सुव्यवस्था ढासळण्याची भीती आहे.
समाजातील प्रत्येकाने पोलिसांवर दबाव आणणे गरजेचे आहे, जेणेकरून अल्पवयीन मुलींचे संरक्षण मजबूत करता येईल आणि अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल.
या प्रकरणात पोलिसांनी तातडीने पुढील कारवाई करावी:
मुलाचे मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड्स आणि सीसीटीव्ही फुटेजचा सखोल तपास करावा.
POCSO आणि IPC अंतर्गत कठोर गुन्हे नोंदवून आरोपींना तातडीने अटक करावी.
मुलाच्या कुटुंबीय, मित्रमंडळी आणि सहकार्य करणाऱ्या लोकांना ताब्यात घ्यावे.
महिला आणि बाल संरक्षण विभागाने या प्रकरणात सक्रिय भूमिका घ्यावी.
पोलीस प्रशासनाच्या निष्क्रीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.
या घटनेत पोलिसांनी निष्क्रियता दाखवली, त्यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट आहे. समाजानेही अशा घटनांविरोधात उभे राहून, “चुकीला माफी नाही” या धोरणाचा अवलंब केला पाहिजे. जर पोलिसांनी तातडीने अॅक्शन घेतली नाही, तर न्यायासाठी मोठे आंदोलन उभारणे गरजेचे आहे

ताज्या बातम्या

error: Content is protected !!